Sunday, 15 October 2017

ग्रामीण रूग्णालय मोखाडा -एक अधोगती

                         साधारणत: २००४-५ सालचा काळ.ग्रामीण रूग्णालय मोखाड्यात नियमित वैद्यकिय अधिक्षक धरून तीन डाक्टर होते.अधिक्षक डा साबदे- भूलरोगतज्ज्ञ,डा कडवेकर -बालरोगतज्ज्ञ आणि डा एक अस्थाई डाक्टर होत्या.नेहमीच्या रूग्णांच्या उपचारा व्यतिरिक्त साबदे सर Minilap TL करायचे. Laparoscopic TL चे कॅम्प सुध्दा ठेवले जायचे.नियमित प्रसूती व्हायच्या.फक्त गुंतागुंतीचे रूग्णच जव्हार किंवा नाशिकला संदर्भित व्हायचे.अधिक्षक स्वत: एक कडक व कुशल प्रशासक होते.पूर्ण रूग्णालयावर त्यांचा वचक तर होताच,शिवाय त्यांनी काही कालावधीसाठी कुटीर रूग्णालय जव्हारचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता.
ग्रामीण रूग्णालय मोखाड्याच्या इतिहासातला हा सर्वोत्तम कालावधी असावा.२००९ पर्यंत एकेक करून वरील तिन्ही डाक्टर बदली होऊन गेले.तिथून या रूग्णालयाची जी अधोगती सुरू झाली ती आजतागायत चालू आहे.                            
       गेल्या ८-९ वर्षात एका पेक्षा एक बेजबाबदार व नाठाळ अधिकारी व कर्मचारी या रूग्णालयाच्या नशिबात आले.पर्यायाने इथल्या रूग्णांची खूपच ससेहोलपट झाली.इथल्या खेड्यातला समाज तसा नागरी जीनवशैलीशी एकदम अनभिज्ञ,मधल्या काळात मोबाईल व टिव्ही मुळे त्यांची थोडीफार बाहेरच्या जगाशी ओळख झाली. तसे चांगले शिकलेले पदवीधर व चांगल्या पदावर नोकरी करणारे स्थानिक लोक आहेत खरे,परंतु ते संख्येने कमी आणि नोकरीसाठी बाहेर असतात.उरलेले अर्धशिक्षीत इकडेच कसेबसे दिवस काढतायत.त्यातल्या थोड्याफार हुशारांनी पत्रकारिता हा व्यवसाय म्हणून स्वीकारला आणि ज्यांना काहीच जमले नाही ते राजकारणात गेले.मोखाडा गावातल्या (माफ करा त्याला शहर नाही म्हणता येणार) लोकांबद्दल तर उपहासाने असे म्हटले जाते की मोखाड्याच्या प्रत्येक घरात वकील ,पत्रकार किंवा राजकारणी जन्माला येतात.यातील उपहासाचा भाग जरी सोडला तरी येथिल सगळेच नसले तरी बहुतांश लोक दुर्देवाने उर्मट व उध्दटपणासाठी कुप्रसिध्द आहेत.समाजाचे नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये असतात, समाजात वावरताना काही जबाबदारी असते याचे त्याना भान नाही.परंतु स्वत:चे न्याय हक्क मिळवण्यासाठी सनदशीर मार्गापेक्षा दंडेलशाहीवर त्यांचा जास्त विश्वास असतो.कुठल्याही सरकारी कार्यालयात किंवा अगदी सरकारी रूग्णालयात सुध्दा राजकिय पुढा-यांच्या ओळखी किंवा वशिल्याशिवाय काम होत नाही असा त्यांचा ठाम समज आहे.म्हणूनच की काय पण राजकिय हस्तक्षेपामुळे कोणी चांगला कर्मचारी टिकत नाही आणि चांगले कर्मचारी नसल्यामुळे ओघानेच राजकिय हस्तक्षेप वाढतो हेच दुष्टचक्र येथे चालू आहे.बरे राजकिय शिरजोरीमुळे व अरेरावीमुळे येथिल पायाभूत सोईसुविधा वाढल्या असेही नाही.मोखाडा गावातील बसस्टॅंड असो किंवा आसे-बेरिस्ते या गावाकडे जाणारा रस्ता असो, गेल्या २५ वर्षापासून जैसे थे याच अवस्थेत आहे.नाही म्हणायला घरांची संख्या किंवा दुकांनाची संख्या वाढली असावी.हे असे कमालीचे निराशाजनक वातावरण येथे भरलेले आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ जोपासणारी मंडळी कुठलाही प्रश्न विधायकपणे कसा सोडवता येईल यात आपला उर्जा खर्च करण्यापेक्षा तो प्रश्न जास्त ज्वलंत भासविण्याचा किंवा भडकवण्याचा जास्त प्रयत्न करतात.
                     वरील सर्व पार्श्वभूमीमुळे येथे बदलीने येणारे सरकारी नोकर स्वेच्छेने बदलून आलेले नसतात.नविन पोस्टींग किंवा प्रशासकिय कारवाईने त्यांना नाईलाजास्तव येणे भाग पडते.किंवा नाशिकहून रोज अपडाऊन करायला सोईस्कर हा त्यांचा हिशोब असतो.ग्रामीण रूग्णालयात चूकून कोणी चांगला कर्मचारी किंवा अधिकारी आला तरी टिकत नाही.कारण इथली व्यवस्थाच ऐवढी कुचकामी झाली आहे की एकटा दुकटा माणूस ती बदलूच शकणार नाही.इथल्या कामाचा दर्जा पाहता या संस्थेची अवनीती (Degradation) करून जर ग्रामीण रूग्णालयाचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर केले तर नक्कीच आता होत असलेल्या कामापेक्षा दुप्पट काम होईल.किंवा Rural Hospital ऐवजी Referring Hospital हे नाव सयुक्तिक राहील.CMO (Casualty Medical Officers) ऐवजी TMO (Traffic Medical Officer)हे पदनाम सुयोग्य राहील.PHC किंवा Subcenter वरून संदर्भित होऊन आलेला रूग्ण SDH ला पाठविणे हे यांचे ऐकमेव महत्वाचे काम असावे.गावखेड्यातल्या दाई किंवा भगत या डाक्टरांपेक्षा जास्त कुशलतेने व प्रामाणिकपणे काम करतात.कधी कधी तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेतून आलेला रूग्ण गाडीच्या खाली सुध्दा उतरवला जात नाही. तसाच परस्पर त्याच वाहनातून उपजिल्हा रूग्णालय किंवा जिल्हा रूग्णालयला पाठवला जातो. पाट्या टाकण्याची हद्द यापेक्षा काय असू शकते.संदर्भसेवा बळकट केली ती अशा निष्क्रिय ग्रामीण रुग्णालयांनी.रूग्णसेवेबद्दल तर विचारायलाच नको. स्वाभाविक प्रसूती,अतिसार,मलेरिया,न्यूमोनिया ,विषमज्वर ,सर्पदंश,विंचूदंश या आजारांवर जर येथे उपचार होणारं नसतील तर ग्रामीण रूग्णालये हवीतच कशाला? फक्त सर्दी पडशाचे रूग्ण तपासायला? किरकोळ सर्दी पडशावर PHC तल्या ANM किंवा MPW सुध्दा उपचार करतात.  एकीकडे आपण 10 वी पास ही शैक्षणिक पात्रता असलेल्या ANM ला  कुशल बनविण्यासाठी Neonatal Resustation  किंवा Skilled Birth Attendant वगैरे  शिकवून प्रशिक्षित करत आहोत. तर  दुसरीकडे या RH च्या नावाला  MBBS  किंवा तत्सम पदव्युत्तर शिक्षण झालेल्या डाक्टरांचे गंजलेले ज्ञान  Septran, PCM, CPM च्या पुढे जात नाही.किंबहुना त्यांनाच नविन शिकायची इच्छा नाही.
   वर्षानुवर्षे हे चालू आहे आणि असेच चालू राहिले तर  मोखाडा आणि त्यांचे ग्रामीण रूग्णालय  पुढील ५० काय १०० वर्षात तरी सुधारेल का?

प्रसूतीपश्चात तांबी कार्यक्रमाची तोकडी लांबी

                     फार पूर्वी म्हणजे मध्ययुगीन काळात अरब व्यापारी लोक एका वाळवंटी प्रदेशातून दुस-या प्रदेशात आपल्याकडील उंटांच्या ताफ्यासह...